Wednesday 1 January 2020

Chapter 1 Part 2 (11-20) अध्याय १ भाग २ (११ - २०)

अध्याय पहिला  श्लोक ११ - २०

नमस्कार!

'सुरेखाज् गीताश्री' 

उद्देश हाच की गीतेचे श्लोक सहजरीत्या शब्दांची फोड करून म्हणता यावेत.  त्याचा अन्वयार्थ समजून घ्यावा या साठी हा माझा प्रयत्न.  

हा ब्लॉग माझे मत व्यक्त करते. ह्या मधे अनेक ग्रंथांचे, पुस्तकांचे, आॅन लाईन मिडीया, माझे सहकारी व आपणां सर्वांचेही संदर्भ व मार्गदर्शन समाविष्ट आहे. आपण आपल्या सद्सद्विवेकबुद्धीस अनुसरून व सत्यता पडताळणीकरुनच पुढील वाटचाल कराल ही खात्रीवजा अपेक्षा.

आपण *Surekha's Geetashree* या नावाचे YouTube channel सुरू केले आहे.पहिल्या अध्यायाचे काही श्लोक यावर upload केले आहेत. तरी सर्वांनी *Surekha's Geetashree* या channel ला *Like* करा, *Subscribe* करा व नविन श्लोक अपलोड केल्याचे notification येण्यासाठी *Bell icon* दाबा.

खालील लिंकवर दाबून channel ला subscribe करा.



Channel Subscription विनामूल्य आहे.


|| श्री परमात्मने नमः ||

अथ प्रथमोऽध्यायः |
 
अयनेषु च सर्वेषु यथाभागमवस्थिताःl
भीष्ममेवाभिरक्षन्तु भवन्तः सर्व एव हि ll११ll

अयनेषु, च, सर्वेषु, यथाभागम्, अवस्थिताः,
भीष्मम्, एव, अभिरक्षन्तु, भवन्तः, सर्वे, एव, हि ll११ll

ज्या ज्या आघाड्यांवर आपली नियुक्ती झाली आहे ती ती आघाडी सर्व योध्यानी दृढपणे सांभाळावी व भीष्माचार्यांचे रक्षण चोहीबाजूने करावे. अस म्हणून तो भीष्माचार्यांना आपलस करायचा प्रयत्न व दुसरे महत्वाचे कारण शिखंडी त्यांच्या समोर यायला नको. जर शिखंडी समोर आला तर ते त्याच्यावर शस्त्र चालविणार नाहीत कारण त्यांनी तशी प्रतिज्ञाच केली आहे. शिखंडी शंकराच्या वरांने भीष्माचार्यांना मारण्यासाठीच उत्पन्न झाला आहे. जर शिखंडी पासून भीष्माचार्यांचे रक्षण झालेतरच आमचा विजय निश्चित होईल. दुर्योधनाप्रती भीष्माचार्यांनी दाखवलेल प्रेम, जिव्हाळा पुढील श्लोकात पाहू.


तस्य संजनयन्हर्षं कुरुवृद्धः पितामहःl
सिंहनादं विनद्योच्चैः शङ्खं दध्मौ प्रतापवान् ll१२ll

तस्य, संजनयन्, हर्षम्, कुरुवृद्धः, पितामह,
सिंहनादम्, विनद्य, उच्चैः, शङ्खम्, दध्मौ, प्रतापवान् ll१२ll

दुर्योधनाला हर्षित करीत भीष्माचार्यांनी शंख वाजविला. कुरुवंशातील सर्वात वृद्ध वयानुसार बाल्हीक भीष्माचार्यांचे काका होते, पण भीष्माचार्य धर्माला व परमेश्वराला विशेष अर्थाने जाणत होते म्हणून त्या ज्ञानवृद्धानां संजय कुरुवृद्धः असे संबोधतात. भीष्माचार्यांच्या त्यागाचा फार मोठा प्रभाव होता. त्यांनी कनक व कामिनीचा त्याग केला होता. ते शस्त्रास्त्र विद्येत निपुण होते व सर्व शास्त्र ही उत्तम जाणत होते. आजोबांना आपल्या नातवाचा, दुर्योधनाचा, बालिशपणा व धूर्तपणा लक्षात आला होता म्हणून त्यांनी त्याला आनंदीत करण्यासाठी शंख वाजविला. ज्याप्रमाणे सिंहाची गर्जना ऐकुन सर्व भयभीत होतात तसे भीष्माचार्यांनी आपला शंख वाजवून सर्वांना भयभीत व दुर्योधनाला आनंदीत केले. पितामह भीष्माचार्यांनी शंख वाजविल्यामुळे काय परीणाम झाला ते
पुढील श्लोकात पाहू.

जेंव्हा भीष्माचार्य शरपंजरी पडले होते, तेंव्हा श्रीकृष्णाने धर्मराजाला सांगितले की धर्म विषयक काही शंका असल्यास त्याचे समाधान भीष्माचार्यांकडून करुन घे.

 
ततः शङ्खाश्र्च भेर्यश्र्च पणवानकगोमुखाः l
सहसैवाभ्यहन्यन्त स शब्दस्तुमुलोऽभवत् ll१३ll

ततः, शङ्खाः, च, भेर्यः, च, पणवानकगोमुखाः,
सहसा, एव, अभ्यहन्यन्त, सः, शब्दः, तुमुलः, अभवत् ll१३ll
 
भीष्माचार्यांनी दुर्योधनाला प्रसन्न करण्यासाठी शंख वाजविला पण कौरव सैन्याला वाटले की हे शंख वादन म्हणजे युद्ध सुरु झाल्याची घोषणाच आहे, म्हणून भीष्माचार्यांचे शंख वादनानंतर कौरव सैन्यातील शंख आदी रणवाद्ये एकदम वाजू लागली होती. ती रणवाद्ये शंख, भेरी, पणव, आनक, गोमुख होत. कौरव सेनेत अत्यंत उत्साह असल्याने त्यांच्या सेनेतील रणवाद्ये वाजविण्यास उशीर किंवा फार परीश्रम लागले नाहीत व वेगवेगळ्या विभागात, तुकड्यात उभ्या असलेल्या कौरवसेनेने वाजवलेल्या रणवाद्यांचा नाद भयंकर मोठ्याने घुमत राहिला. धृतराष्ट्राने संजयला सुरवातीलाच विचारले होते की"युद्धक्षेत्रात माझ्या व पांडुच्या पुत्रांनी काय केले? "म्हणून संजयने दुसऱ्या श्लोका पासून तेराव्या श्लोका पर्यंत" धृतराष्ट्र पुत्रांनी काय केले"हे सांगितले. आता पुढील श्लोकांपासून "पांडव पुत्रांनी काय केले" त्याचे हे पाहू.
 


ततः श्र्वेतैर्हयैर्युक्ते महति स्यन्दने स्थितौ l
माधवः पाण्डवाश्र्चैव दिव्यौ शङ्खौं प्रदध्मतुः ll१४ll

ततः, श्र्वेतैर्हयैर्युक्ते, हयैः, युक्ते, महति, स्यन्दने, स्थितौ,
माधवः, पाण्डवः, च, एव, दिव्यौ, शङ्खौ, प्रदध्मतुः ll१४ll
चित्ररथ गंधर्वाने अर्जुनाला दिव्य असे शंभर घोडे दिले होते. ह्या घोड्यांचे वैशिष्ट्य असे की यापैकी युद्धात कितीही घोडे मारले गेले तरी घोड्यांची संख्या शंभरच रहायची. हे घोडे पृथ्वी, स्वर्ग कोठेही जाऊ शकत होते. असे चार घोडे अर्जुनाच्या रथाला जुंपलेले होते. अग्नींने खांडववन जाळल, नंतर अर्जुनाला एक विशाल रथ दिला होता त्यात नऊ बैलगाडी भरतील ईतकी शस्त्रास्त्रे असत. तो सोन्याने मढवलेला अत्यंत तेजःपुंज रथ होता. त्यावरील ध्वज विजेप्रमाणे चमकत होता व एक योजने म्हणजे चारकोसा पर्यंत फडकत असे व त्यावर श्रीहनुमानजी विराजमान होते. प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्ण  व त्याचा भक्त अर्जुन विराजमान झाले होते. त्यामुळे रथाची शोभा व तेज आणखी वाढले. माधव - श्रीकृष्ण, पाण्डव - अर्जुन. नर व नारायण दोघेही. दोघांच्याही हातात दिव्य तेजःपुंज व अलौकिक शंख होते. ते त्यांनी खुप जोरात वाजविले. आता येथे आपल्याला असे वाटते की प्रथम शंख सेनापतींनी वाजवायला हवा होता, मग श्रीकृष्णाने का वाजविला? भगवंत सारथी असूदेत की महारथी असू देत ते प्रमुखच आहेत. ते सर्वांहून श्रेष्ठच आहेत आणि तेच सर्वांचे संचालन करतात. म्हणून त्यांनी पहिल्यांदा शंख वाजविला.
आता पुढील चार श्लोकात शंख वादनाचे वर्णन आहे ते पाहू.

पाञ्चजन्यं ह्रषीकेशो देवदत्तं धनञ्जयःl
पौण्ड्रं दध्मौ महाशङ्खं भीमकर्मा वृकोदरः ll१५ll

पाञ्चजन्यम्, ह्रषीकेशः, देवदत्तम्, धनंजयः,
पौण्ड्रम्, दध्मौ, महाशङ्खम्, भीमकर्मा, वृकोदरः ll१५ll
श्रीकृष्णाने पाञ्चजन्य शंख वाजविला. भगवंतानी
पाञ्चजन्य नावाच्या  शंखरुप धारण करणाऱ्या राक्षसाला ठार मारुन त्याला शंखरुपाने आपल्या जवळ ठेवले, म्हणून हा पांजजन्य. अर्जुनाचे नांव धनंजय त्यांने राजसूय यज्ञाच्यावेळी असंख्य राजांना जिंकून खूप मोठ्या प्रमाणात धन एकत्रित केले म्हणून तो धनंजय. तसेच त्याला इंद्राने नितातकवचादी दैत्याबरोबर युद्ध करतांना देवदत्त नांवाचा शंख दीला. त्याचा आवाज खूप मोठ्याने होत असे. अर्जुनाने देवदत्त नांवाचा शंख फुंकला. हिडिंबा सुर, बकासुर, जटासुर, किचक, जरासंध ह्यांना ठार मारल्याने भीमाचे नांव भीमकर्मा पडले तसेच त्याच्या पोटात वृक नांवाचा अग्नी होता. म्हणून तो वृकोदर.भीमाने पौंड्र नांवाचा शंख फुंकला.

आपण *Surekha's Geetashree* या नावाचे YouTube channel सुरू केले आहे.पहिल्या अध्यायाचे काही श्लोक यावर upload केले आहेत. तरी सर्वांनी *Surekha's Geetashree* या channel ला *Like* करा, *Subscribe* करा व नविन श्लोक अपलोड केल्याचे notification येण्यासाठी *Bell icon* दाबा.

खालील लिंकवर दाबून channel ला subscribe करा.



Channel Subscription विनामूल्य आहे.


अनन्तविजयं राजा कुन्तीपुत्रो युधिष्ठिरः l
नकुलः सहदेवश्र्च सुघोषमणिपुष्पकौ ll१६ll


अनन्तविजयम्, राजा, कुन्तीपुत्रः, युधिष्ठिरः,
नकुलः, सहदेवः, च, सुघोषमणिपुष्पकौ ll१६ll
कुन्तीपुत्र युधिष्ठिराला राजा संबोधले आहे. कारण भविष्यकाळात युधिष्ठिर संपूर्ण पृथ्वीचे राजे होणार आहेत हा संकेत संजयनी दिला. अनंतविजय नामक शंख युधिष्ठिराने वाजविला. नकुलांनी सघोष नांवाचा शंख व सहदेवांनी मणिपुष्पक नांवाचा शंख वाजविला. 

काश्यश्र्च परमेष्वासः शिखण्डी च महारथः l
धृष्टद्युम्नो विराटश्र्च सात्यकिश्र्चापराजितः ll१७ ll

काश्यः, च, परमेष्वासः, शिखण्डी, च, महारथः,

धृष्टद्युम्नः, विराटः, च, सात्यकिः, च, अपराजितः ll१७ll

द्रुपदो द्रौपदेयाश्र्च सर्वशः पृथिवीपते l

सौभद्रश्र्च महाबाहुः शङ्खान्दध्मुः पृथक् पृथक् ll१८ll

द्रुपदः, द्रौपदेयाः, च, सर्वशः, पृथिवीपते,

सौभद्रः, च, महाबाहुः, शङ्खान्, दध्मुः, पृथक्, पृथक्ll१८ll
हे राजन् श्रेष्ठ धनुर्धारी काशिराज, महारथी शिखंडी, धृष्टद्युम्न, राजा विराट, अजेय सात्यकी, राजा द्रुपद, द्रौपदीचे पाच पुत्र तसेच विशाल बाहू असणारा सुभद्रा पुत्र अभिमन्यू यांनी सर्व बाजूंनी आपआपले वेगवेगळे शंख वाजविले.
कौरवसेनेच्या पितामह भिष्मांचेच फक्त नांव घेतले तर पांडव सेनेच्या अठरा वीरांची नांवे घेतली. संख्यमाना प्रमाणे अधर्माच्या पक्षाचे जास्त वर्णन नको होते. धर्माच्या पक्षाचे जेथे प्रत्यक्ष भगवंत आहेत त्यां पक्षाचे अधिक वर्णन केले. पांडव सेनेच्या शंख वादनाचा कौरवसेनेवर काय परीणाम झाला ते पुढील श्लोकात सांगीतले आहे. 


सघोषो धार्तराष्ट्राणां ह्रदयानि व्यदारयत् l
नभश्र्च पृथिवीं चैव तुमुलो व्यनुनादयन् ll१९ll

सः, घोषो, धार्तराष्ट्राणाम्, ह्रदयानि, व्यदारयत्,

नभः, च, पृथिवीम्, च, एव, तुमुलः, व्यनुनादयन् ll१९ll
पांडवसेनेचे शंखवादन तीव्र, भयंकर, मोठे होते. त्याच्या ध्वनीप्रतिध्वनींने पृथ्वी, आकाश व्यापून गेले. त्या  आवाजाने अन्यायाचे राज्य हडप करू इच्छिणारे व त्यांना मदत करणारे सर्वांची ह्रदये विदीर्ण झाली. कौरवसेनेचा उत्साह, बळ कमजोर झाले आणि त्यांना पांडवसेनेचे भय वाटू लागले. तेच कौरवसेनेच्या शंखवादनाचा काहीही परीणाम पांडवसेनेवर झाला नाही. ते स्थिर होते कारण ते धर्मानुसार वागात होते, कर्तव्याचे पालन करत होते, त्यांचा पक्ष न्यायाचा होता म्हणून त्यांना भिती नव्हती तर उत्साह होता.ह्या वरुन आपण एक गोष्ट समजली पाहिजे आपणा कडुन आपल्या शरीर, वाणी, मन यांच्या द्वारे कधीही अन्याय  व अधर्माचे आचरण करायचे नाही. अन्याय व अधर्माने आपले ह्रदय कमकुवत व बलहीन होते.आता पर्यंत धृतराष्ट्राच्या प्रश्नांची उत्तरे दिली. आता या पुढे भगवद्गीता ज्या प्रसंगानंतर सांगितली गेली तो प्रसंग सांगण्यास संजय सुरवात करतात.



आपण *Surekha's Geetashree* या नावाचे YouTube channel सुरू केले आहे.पहिल्या अध्यायाचे काही श्लोक यावर upload केले आहेत. तरी सर्वांनी *Surekha's Geetashree* या channel ला *Like* करा, *Subscribe* करा व नविन श्लोक अपलोड केल्याचे notification येण्यासाठी *Bell icon* दाबा.

खालील लिंकवर दाबून channel ला subscribe करा.

Channel Subscription विनामूल्य आहे.


अथ व्यवस्थितान्दृष्ट्वा धार्तराष्ट्रान्कपिध्वजः l
प्रवृत्ते शस्त्रसंपाते धनुरुद्यम्य पाण्डवः ll२०ll

अथ, व्यवस्थितान्, दृष्ट्वा, धार्तराष्ट्रान्, कपिध्वजः,

प्रवृत्ते, शस्त्रसंपाते, धनुः, उद्यम्य, पाण्डवःll२०ll
आता 'अथ' म्हणजे सुरुवात, संजय भगवान श्रीकृष्ण व अर्जुनाच्या संवादरुपी श्रीमद्भगवदगीतेस सुरवात करतात. अठराव्या अध्यायाच्या चौऱ्याहत्तराव्या  (७४) श्लोकात 'इति' पदाने संवाद समाप्त होतो. तसेच दुसऱ्या अध्यायाच्या अकराव्या  (१८) श्लोकांपासून उपदेशास सुरवात होते व अठराव्या अध्यायाच्या सहासष्टाव्या (६६)  श्लोकात हा उपदेश समाप्त होतो.
युद्धाला सज्ज झालेले सैन्य पाहून अर्जुनाला विरश्री संचारली आणि त्यांने आपले गांण्डीव हातात घेतले. आता येथे पहा दुर्योधनाने जेंव्हा पांडव सैन्य पाहीले तेंव्हा तो धावत धावत द्रोणाचार्यांच्या कडे गेला होता. दुर्योधनाच्या अंतःकरणात भय तर अर्जुनाच्या अंतःकरणात निर्भयता, उत्साह, वीरता आहे.अर्जुनाचे रथाच्या ध्वजावर श्रीहनुमानजी विराजमान आहेत. त्यांचाच विजय निश्चित आहे. धृतराष्ट्राला वारंवार पांडवांची आठवण करुन देण्यासाठी हा पांडवा शब्द. चौदाव्या श्लोकात ही आहे कारण हाच शब्द धृतराष्ट्रांने प्रथम वापरला.




Disclaimer: The views expressed are my personal opinions and the blog is for generic information purpose only. Readers are advised to verify the facts.All content provided in the blog is for informative purpose only. The owner of this blog makes no representations as to the accuracy or completeness of any information on this blog or bound by following any link on this blog. The owner will not be liable for any errors or omissions in the information nor for the availability of the information. The owner will not be liable for any losses, injuries or damages from display or use of this information. These terms and conditions of use are subject to change at any time and without notice.

No comments:

Post a Comment