Saturday 4 January 2020

Chapter 1 Part 3 (21-30) अध्याय १ भाग ३ (२१ - ३०)

अध्याय पहिला  श्लोक २१ - ३० 

नमस्कार!

'सुरेखाज् गीताश्री' 

उद्देश हाच की गीतेचे श्लोक सहजरीत्या शब्दांची फोड करून म्हणता यावेत.  त्याचा अन्वयार्थ समजून घ्यावा या साठी हा माझा प्रयत्न.  

हा ब्लॉग माझे मत व्यक्त करते. ह्या मधे अनेक ग्रंथांचे, पुस्तकांचे, आॅन लाईन मिडीया, माझे सहकारी व आपणां सर्वांचेही संदर्भ व मार्गदर्शन समाविष्ट आहे. आपण आपल्या सद्सद्विवेकबुद्धीस अनुसरून व सत्यता पडताळणीकरुनच पुढील वाटचाल कराल ही खात्रीवजा अपेक्षा.

आपण *Surekha's Geetashree* या नावाचे YouTube channel सुरू केले आहे.पहिल्या अध्यायाचे काही श्लोक यावर upload केले आहेत. तरी सर्वांनी *Surekha's Geetashree* या channel ला *Like* करा, *Subscribe* करा व नविन श्लोक अपलोड केल्याचे notification येण्यासाठी *Bell icon* दाबा.

खालील लिंकवर दाबून channel ला subscribe करा.



Channel Subscription विनामूल्य आहे.


|| श्री परमात्मने नमः ||

अथ प्रथमोऽध्यायः |

ह्रषीकेशं तदा वाक्यमिदमाह महीपते l
               अर्जुन उवाच
सेनयोरुभयोर्मध्ये रथं स्थापय मेऽच्युत ll२१ll

ह्रषीकेशम्, तदा, वाक्यम्, इदम्, आह, महीपते, 

अर्जुन उवाच  
सेनयोः, उभयोः, मध्ये, रथम्, स्थापय, मे, अच्युत ll२१ll

अर्जुन शूरतेने, उत्साहाने, कर्तव्याने भरलेले बोलणे असणारा  तो भगवान श्रीकृष्णाना जे जगद्गुरू, अंतर्यामी, मन बुद्धीचे प्रेरक आहेत त्यांना म्हणाला, रथ दोन्ही सैन्यांच्या मध्ये उभा कर. ज्यामुळे मला दोन्ही सैन्यांना सहज रीतीने पाहता येईल.
'सेनयोरुभयोर्मध्ये' हे पद गीतेत तीन वेळा आले आहे. २१ व्या श्लोकात शौर्याने रथ दोन्ही सैन्याच्या मध्यभागी, २४ व्या श्लोकात कुरुवंशीयांना पाहण्यासाठी आणि अध्याय २ मधील १० वा श्लोक विषादयुक्त अर्जुनाला गीतेचा उपदेश.
आता येथे हे लक्षात येते प्रथम अर्जुनात शूरवीरता होती, मध्यंतरी कुटुंबीयांना पाहिल्याने तो मोहाने युद्धापासून परावृत्त झाला आणि शेवटी त्याला भगवंताकडून गीतेचा महान उपदेश प्राप्त झाला. मोह नष्ट झाला. मग आपण कोठेही असू कोणत्याही परिस्थितीत असू त्या परिस्थितीत निष्काम होऊन परमात्म्याची प्राप्ती करु शकतो.
अशा ठिकाणी रथ उभा कर की मी सर्वांना पाहू शकेन, त्यांच्या सामर्थ्याचा अंदाज घेऊ शकेन.

यावदेतान्निरीक्षेऽहं योद्धुकामानवस्थितान् l
कैर्मया सह योद्धव्यमस्मिनरणसमुद्यमे ll२२ll

यावत्, एतान, निरीक्षे, अहम्, योद्धुकामान्, अवस्थितान्,
कैः, मया, सह, योद्धव्यम्, अस्मिन् रणसमुद्यमे ll२२ll

श्रीकृष्ण म्हणतात दोन्ही सैन्याच्या मध्यभागी रथ कुठ पर्यंत उभा करायचा? अर्जुन म्हणाला जो पर्यंत मी युद्धाच्या ईच्छेने असलेल्या कौरवसैन्यातील राजे लोकांना पाहू शकेन तो पर्यंत. मला कोणाशी युद्ध करायचे आहे, माझ्या बरोबरीचे कोण, माझ्या पेक्षा कमी कोण, माझ्या पेक्षा वरचढ कोण? हे तरी मला पाहू द्या. अर्जुन म्हणतोय आम्ही तर तडजोड करणार होतो. पण त्यांनी त्याचा स्वीकार केला नाही कारण त्यांना युद्ध हवे आहे. किती शक्तीने ते युद्धात उतरले आहेत ते मला पहावयाचे आहे.

योत्स्यमानानवेक्षेऽहं य एतेऽत्र समागताः l
धार्तराष्ट्रस्य दुर्बुद्धेर्युद्धे प्रियचिकीर्षवः ll२३ll

योत्स्यमानान्, अवेक्षे, अहम्, ये, एते, अत्र, समागताः,
धार्तराष्ट्रस्य, दुर्बुद्धे, युद्धे, प्रियचिकीर्षवः ll२३ll

दुर्योधनाला दुष्टबुद्धी म्हटले आहे. त्यांनी आमचा नाश करण्यासाठी अनेक प्रकार केले, आम्हांला अपमानित केले, आम्ही न्यायानुसार मागितलेले राज्यही देण्यास नकार दिला. आणि अशा माणसाला युद्धात विजयी करण्यांस अनेक राजे आलेत. खरतर मित्रांचे हे कर्तव्य असते की त्यानी आपल्या मित्राचे इहलौकीक व पारलौकीक होत जपावे पण येथे ते कांहीच नाही. या युद्धासाठी उतावीळ झालेल्यांना पाहतो. त्यांनी अधर्माचा, अन्यायाचा पक्ष घेतलाय ते आमच्या पुढे टिकणार नाहीत. आता भगवंत काय करतात हे पुढील श्लोकात पाहू.


सञ्जय उवाच
एवमुक्तो ह्रषीकेशो गुडाकेशेन भारत l
सेनयोरुभरयोर्मध्ये स्थापयित्वा रथोत्तमम् ll२४ll

सञ्जय उवाच

एवम्, उक्तः, ह्रषीकेशः, गुडाकेशेन, भारत,
सेनयोः, उभयोः, मध्ये, स्थापयित्वा, रथोत्तमम् ll२४ll

ज्यांचे केस कुरळे आहेत व ज्याचा निद्रेवर अधिकार आहे तो गुडाकेश. जो निद्रा, आळस, सुखाचा गुलाम होत नाही केवळ भगवंताचा भक्त आहे. अशा भक्ताची गोष्ट भगवंत ऐकतात व तो सांगेल तस करतात. श्रीकृष्णानी अर्जुनाच्या सांगण्या प्रमाणे रथ दोन्ही सैन्याच्या मध्यभागी ऊभा केला.
इंद्रियांचा ईश (स्वामी) म्हणजे ह्रषीकेश. २१ व्या श्लोकात व येथे ह्रषीकेश म्हटले आहे जे मन, बुद्धी व इंद्रियांना प्रेरणा देणारे आहेत, सर्वांना आज्ञा देणारे आहेत तेच भगवंत येथे अर्जुनाची आज्ञा पाळणारे आहेत.
दोन्ही सैन्याच्या मध्यभागी ज्याठिकाणी रिकामी जागा होती त्या ठिकाणी भगवंतानी अर्जुनाचा दिव्य रथ उभा केला.



आपण *Surekha's Geetashree* या नावाचे YouTube channel सुरू केले आहे.पहिल्या अध्यायाचे काही श्लोक यावर upload केले आहेत. तरी सर्वांनी *Surekha's Geetashree* या channel ला *Like* करा, *Subscribe* करा व नविन श्लोक अपलोड केल्याचे notification येण्यासाठी *Bell icon* दाबा.

खालील लिंकवर दाबून channel ला subscribe करा.

Channel Subscription विनामूल्य आहे.



भीष्मद्रोणप्रमुखतः सर्वेषां च महीक्षिताम् l
उवाच पार्थ पश्यैतान्समवेतान्कुरुनिति  ll२५ll

भीष्मद्रोणप्रमुखतः, सर्वेषाम्, च, महीक्षिताम्,
उवाच, पार्थ, पश्यैतां, एतान्, समवेतान्, कुरुन्, इति ll२५ll

श्रीकृष्णाने रथ इतक्या चातुर्याने उभा केला कि जेथून अर्जुनाला पितामह भीष्माचार्य, गुरु द्रोणाचार्य आणि  कौरवसैन्यातील प्रमुख राजलक्ष्मी दिसतील.
कुरुवंशात धृतराष्ट्र पुत्र व पांडू पुत्र दोन्ही येतात.कुरुवंशीयांना पाहून अर्जुनाच्या अंतःकरणात कौटुंबिक भाव उत्पन्न झाला. कसेही असलो तरी आम्ही भावंडे आहोत. मोह उत्पन्न झाला आणि तो व्हावा ही भगवंताची ईच्छा होती. ज्यामुळे मोहीत झालेल्या अर्जुनाचे निमित्त करुन संपूर्ण मानवजातीला गीतेचा महान उपदेश दिला जावा.
कौटुंबिक प्रेम व भगवद् भक्ती या दोन्हीत खुप अंतर आहे. कुटुंबात ममतायुक्त प्रेम असते त्यामुळे अवगुणांकडे लक्ष जात नाही. हे माझे आहेत हा भाव असतो, मोह असतो, अंधार असतो, कर्तव्य टाकणारा असतो. तेच भगवद् भक्तीत भक्त भगवंताचा असतो, भाव असतो, प्रकाश असतो, कर्तव्य पाळतो.
कुरुवंशीयांना पहा म्हंटल्यावर पुढे काय झाले  ते पुढील श्लोकात पाहू




तत्रापश्यात्स्थितान्पार्थः पितृनथ पितामहान् l
आचार्यान्मातुलान्भ्रातृन्पुत्
रान्पौत्रान्सखींस्तथा ll२६ll


तत्र, अपश्यत्, स्थितान्, पार्थः, पितृन्, अथ, पितामहान्,
आचार्यान्, मातुलान्, भ्रातृन्, पुत्रान्, पौत्रान्, सखीन्, तथा ll२६ll
 
युद्धभूमीवर एकत्र जमलेल्या कुरुवंशीयांना पाहताना अर्जुनाची दृष्टी दोन्ही सैन्यातील आपल्या कुटुंबियांवर पडली. आपले वडीलांसमान सगळे काका, भीष्माचार्य, सौमदत्त हे पितामह, द्रोणाचार्य, कृपाचार्य कुलगुरु, पुरुजित, कुंतिभोज, शल्य, शकुनी मामा, भीम, दुर्योधन भाऊ, अभिमन्यू, घटोत्कच, लक्ष्मण दुर्योधनाचा मुलगा असे माझे व माझ्या भावांचे पुत्र उभे आहेत तसेच आमचे पौत्र ही आहेत.

श्वशुरान्सुह्रदयश्र्चैव सेनयोरुभयोरपि l
तान्समीक्ष्य स कौन्तेयः सर्वांन्बन्धूनवस्थितान् ll२७ll
श्वशुरान्, सुह्रदः, च, एव, सेनयोः, उभयोः, अपि। 
तान् समीक्ष्य, स कौन्तेयः, सर्वान् बन्धून्  अवस्थितान् ll२७ll
दुर्योधनाचे अश्वत्थामा इत्यादी मित्र आहेत व आमचेही मित्र आमच्या पक्षात आहेत. द्रुपद, शैब्य इत्यादी सासरेही आहेत. तसेच कोणत्याही हेतुवाचून पक्षाचे होत साधणारे सात्यकी व कृतवर्माही आहेत. तसेच प्रपितामहा बाल्हीक, धृष्टद्युम्न, शिखंडी, सुरथ व जयद्रथ म्हणणेही आहेत. ह्या सर्वांना पाहून अर्जुन अत्यंत भयभीत झाला.
युद्धात कोणीही मरो ते सर्व आपलेच संबंधीत आहेत. नुकसान आमचेच आहे. कुल तर आमचेच नष्ट होईल. अशा विचाराने त्याची युद्धाविषयीची इच्छाच नाहीशी झाली. अंतःकरण भीतीने ग्रासले गेले. या भीतीलाच भगवंतानी अध्याय २ मधील २-३ श्लोकात "कश्मलम्" व "ह्रदयदौर्बल्यम्" म्हंटले आहे आणि अर्जुनाने अध्याय २ श्लोक ७ मध्ये "कार्पण्यदोषोपहतस्वभावः" म्हणून त्याचा स्वीकार केला आहे.
अर्जुनाला पूर्वी भीती नव्हती, ती आता निर्माण झाली. अगन्तुक आहे, त्यामुळे ती राहणार नाही. शूरवीरता आधी पासून होती, स्वाभाविक होती त्यामुळे ती जायचा प्रश्नच नाही.
पण ज्यांनी आपल्यावर अन्याय केला आहे त्या अधर्मी पापी लोकांना बद्दल करुणा येते व तो क्षात्रवृत्ती पासून परावृत्त होऊ पहात आहे. ह्या सर्व विचारांना व्यथित झालेला अर्जुन काय म्हणतोय ते पाहू.

कृपया परयाविष्टो विषीदन्निदमब्रवीत्  l
अर्जुन उवाच
दृष्ट्वेमं स्वजनं कृष्ण युयुत्सुं समुपस्थितम् ll२८ll

कृपया, परया, अविष्टः, विषीदन्, इदम्, अब्रवीत्,
अर्जुन उवाच 
दृष्ट्वा, इमम्, स्वजनम्, कृष्ण, युयुत्सुम्, समुपस्थितम् ll२८ll 
अर्जुनाला "कृष्ण" हे संबोधन फार आवडते. ते श्रीकृष्णासाठी गीतेत ९ वेळा आले आहे.  अर्जुनाला श्रीकृष्ण "पार्थ" म्हणून संबोधत असे. अर्जुनाला दोन्ही कडील कुटुंबियांच्या मरणाच्या आशंकेने घेरले आहे.कोणीही मेहेत्रे ते आमचेच. दुर्योधनाचे पाहणे एकतर्फी होते ती युद्ध दृष्टी होती. अर्जुनाचे पाहणे दोन प्रकारचे होते. पहिल्यांदा तो वीरश्रीने युद्ध करण्यांस उभा होता. आणि आता स्वजनांना पाहून भीतीने युद्धा पासून परावृत्त होतो आहे व त्याच्या हातातून धनुष्य गळून पडत आहे.


आपण *Surekha's Geetashree* या नावाचे YouTube channel सुरू केले आहे.पहिल्या अध्यायाचे काही श्लोक यावर upload केले आहेत. तरी सर्वांनी *Surekha's Geetashree* या channel ला *Like* करा, *Subscribe* करा व नविन श्लोक अपलोड केल्याचे notification येण्यासाठी *Bell icon* दाबा.

खालील लिंकवर दाबून channel ला subscribe करा.

Channel Subscription विनामूल्य आहे.


सीदन्ति मम गात्राणि मुखं च परिशुष्यति l
वेपतुश्र्च शरीरे मे रोमहर्षश्र्च जायते ll२९ll

सीदन्ति, मम, गात्राणि, मुखम्, च, परिशुष्यति,
वेपथुः, च, शरीरे, मे, रोमहर्षः, च, जायते ll२९ll

गाण्डीवं स्त्रंसते हस्तात्त्वक्चैव परिदह्यते l
न च शक्नोम्यवस्थातुं भ्रमतीव च मे मनः ll३०ll

गाण्डीवं, स्त्रंसते, हस्तात्, त्वक्, च, एव, परिदह्यते,
न, च, शक्नोमि, अवस्थातुम्, भ्रमति, इव, च, मे, मनःll३०ll
अर्जुनाच्या मनांत युद्धामुळे भविष्यकाळात होणाऱ्या परिणामांची चिंता आहे, दुःख आहे. ह्या चिंतेचा, दुःखाचा परिणाम त्याच्या संपूर्ण शरीरावर होत आहे. माझे हात, पाय, तोंड हे सर्व अवयव शिथील पडले आहेत. मुख कोरडे पडले आहे, बोलताही येत नाही, थरकाप उडाला आहे, शरीर रोमांचित झाले आहे व ज्या गांण्डीवाच्या टणत्काराने शत्रू भयभीत होत होते तेच गांण्डीव आता माझ्या हातातून गळून पडत आहे. शरीराचा दाह होत आहे आणि मन भ्रमित होत आहे. माझे कर्तव्य काय तेच कळत नाही. रथावर उभा राहण्यासही मी असमर्थ आहे. असे  वाटते की मी मूर्च्छित होऊन खाली पडेन. अशा अनर्थकारी युद्धात उभे  राहणे पाप आहे.
 Disclaimer: The views expressed are my personal opinions and the blog is for generic information purpose only. Readers are advised to verify the facts.All content provided in the blog is for informative purpose only. The owner of this blog makes no representations as to the accuracy or completeness of any information on this blog or bound by following any link on this blog. The owner will not be liable for any errors or omissions in the information nor for the availability of the information. The owner will not be liable for any losses, injuries or damages from display or use of this information. These terms and conditions of use are subject to change at any time and without notice.

No comments:

Post a Comment