Saturday 4 January 2020

Chapter 1 Part 5 (40-47) अध्याय १ भाग ५ (४०-४७)

नमस्कार!  

'सुरेखाज् गीताश्री' 

उद्देश हाच की गीतेचे श्लोक सहजरीत्या शब्दांची फोड करून म्हणता यावेत.  त्याचा अन्वयार्थ समजून घ्यावा या साठी हा माझा प्रयत्न.  

हा ब्लॉग माझे मत व्यक्त करते. ह्या मधे अनेक ग्रंथांचे, पुस्तकांचे, आॅन लाईन मिडीया, माझे सहकारी व आपणां सर्वांचेही संदर्भ व मार्गदर्शन समाविष्ट आहे. आपण आपल्या सद्सद्विवेकबुद्धीस अनुसरून व सत्यता पडताळणीकरुनच पुढील वाटचाल कराल ही खात्रीवजा अपेक्षा.

आपण *Surekha's Geetashree* या नावाचे YouTube channel सुरू केले आहे.पहिल्या अध्यायाचे काही श्लोक यावर upload केले आहेत. तरी सर्वांनी *Surekha's Geetashree* या channel ला *Like* करा, *Subscribe* करा व नविन श्लोक अपलोड केल्याचे notification येण्यासाठी *Bell icon* दाबा.

खालील लिंकवर दाबून channel ला subscribe करा.



Channel Subscription विनामूल्य आहे.


||  श्री परमात्मने नमः ||

कुलक्षये प्रणश्यन्ति कुलधर्माः सनातनाः l
धर्मे नष्टे कुलं कृत्स्नमधर्मोऽभिभवत्युत ll४०ll

कुलक्षये, प्रणश्यन्ति, कुलधर्माः, सनातनाः,
धर्मे, नष्टे, कुलम्, कृत्स्नम्, अधर्मः, अभिभवति, उत ll४०ll

जेंव्हा युद्ध सुरू होते तेंव्हा त्यात कुलाचा(वंशाचा) क्षय होतो. कुळधर्म , कुळाच्या पवित्र परंपरा, रीतीरिवाज, मर्यादा ह्या देखील चालत आलेल्या आहेत. त्याच्या बरोबर असणारे धर्म नष्ट होतील. जन्म झाल्यावर, मौजीबंधन,विवाह, मृत्यू समयी व त्यानंतरचे शास्त्रोक्त पवित्र रीतीरिवाज जे इहलोकी व परलोकी मनुष्याचे कल्याण करतात ते सर्व नष्ट होतील कारण कुलाचाच नाश झालातर कुला बरोबर राहणारे धर्म कसे राहतील?
जेंव्हा काळच नष्ट होईल तेंव्हा धर्मविरोधी कर्म केली जातील. अधर्माचे प्राबल्य वाढेल. कर्ता पुरुषच युद्धात गेला तर बालक व स्त्रियाच राहतील. त्यांना उत्तम शिक्षण देणारेच नसतील तर ते अधर्मानेच वागतील.

अधर्माभिभवात्कृष्ण प्रदुष्यन्ति कुलस्त्रियः l
स्त्रीषु दुष्टासु वार्ष्णेय जायते वर्णसङ्करः ll४१ll

अधर्माभिभवात्, कृष्ण, प्रदुष्यन्ति, कुलस्त्रियः,
स्त्रीषु, दुष्टासु, वार्ष्णेय, जायते, वर्णसंकरः ll४१ll

धर्माचे पालन केल्याने अंतःकरण शुद्ध होते त्यामुळे बुद्धी सात्विक बनते व विवेक जागृत होतो. परंतु जेंव्हा कुळात अधर्म वाढतो तेंव्हा आचरण अशुद्ध होते त्यामुळे अंतःकरण अशुद्ध बनते, बुद्धी तामसी होते, मनुष्य कर्तव्य टाळतो, शास्त्रा विरुद्ध विचार करू लागतो. कुलस्त्रिया दुषित होतात, वर्णसंकर होतो.
मग, हे कृष्णा, तूच सांग, आमच्या कुलाला मग कोठे न्याल? त्याला काय म्हणाल? कोणता वंश म्हणाल? म्हणून कुळाचा नाश करणे योग्य नाही.
वार्ष्णेय - श्रीकृष्णाने वृष्णी वंशात अवतार घेतला म्हणून त्यांना वार्ष्णेय म्हणतात


सङ्करो नरकायैव कुलघ्नानां कुलस्य च l
पतन्ति पितरो ह्येषां लुप्तपिण्डोदकक्रियाः ll४२ll

संकरः, नरकाय, एव, कुलघ्नानाम्, कुलस्य, च,
पतन्ति, पितरः, हि, एषाम्, लुप्तपिण्डोदकक्रियाः ll४२ll

वर्णसंकर झाल्याने कुलधर्माचे पालन, कुलपरंपरा नष्ट होतात. श्राद्ध तर्पण होत नाही त्यामुळे पितरही त्यांच्या स्थानातुन खाली येतात. आदरबुद्धीने, शास्त्रा नुसार श्राद्ध तर्पण करावे.

दोषैरेतैः कुलघ्नानां वर्णसङ्करकारकैः l
उत्साद्यन्ते जातिधर्माः कुलधर्मश्र्च शाश्वताः ll४३ll


दोषैः, एतत्, कुलघ्नानाम्, वर्णसङ्करकारकैः,
उत्साद्यन्ते, जातिधर्माः, कुलधर्माः, च, शाश्वताः ll४३ll
युद्धात कुलाचा नाश झाल्याने पूर्वापार चालत आलेले कुलधर्म नष्ट होतात. जातिधर्म नष्ट होतात. कुलधर्म---कुलाची वेगळी परंपरा, रीतीरिवाज, मर्यादा, आचरण. जातिधर्म —संपूर्ण कुलसमुदायाचे रीतीरिवाज, मर्यादा, आचरण होय. 

आपण *Surekha's Geetashree* या नावाचे YouTube channel सुरू केले आहे.पहिल्या अध्यायाचे काही श्लोक यावर upload केले आहेत. तरी सर्वांनी *Surekha's Geetashree* या channel ला *Like* करा, *Subscribe* करा व नविन श्लोक अपलोड केल्याचे notification येण्यासाठी *Bell icon* दाबा.

खालील लिंकवर दाबून channel ला subscribe करा.



Channel Subscription विनामूल्य आहे.

उत्सन्नकुलधर्माणां मनुष्याणां जनार्दन l
नरकेऽनियतं वासो भवतीत्यनुशुश्रुम ll४४ll

उत्सन्नकुलधर्माणाम्, मनुष्याणाम्, जनार्दन,
नरके, अनियतम्, वासः, भवति, इति, अनुशुश्रुम ll४४ll


भगवंतानी मनुष्याला विवेक दिला आहे, नवीन कर्म करण्याचा अधिकार दिला आहे. तो कर्म करण्यांस स्वतंत्र आहे - चांगले किंवा वाईट. खरे तर त्याने विचारपूर्वक चांगलेच कर्म करायला हवे पण तो सुखोपभोगाच्या लोभात फसतो व आपला विवेक घालवतो. षड्रिपूत अडकतो व त्याचे आचरण धर्माविरोधी होऊ लागते. त्याचा परिणाम इहलोकी निंदा, अपमान, तिरस्कार होतो तर परलोकात दुर्गती, नरकाची प्राप्ती होते व नरकयातना भोगाव्या लागतात असे आम्हीं परंपरेने वडिलधाऱ्यांकडून व गुरुजनांकडून ऐकत आलो आहोत. ह्या सर्व अनर्थ वर्णनाचा स्वतः अर्जुनावर काय परिणाम झाला ते पाहू.

अहो बत महत्पापं कर्तुं व्यवसिता वयम् l
यद्राज्यसुखलोभेन हन्तुं स्वजनमुद्यताः ll४५ll

अहो, बत, महत्पापम्, कतुम्, व्यवसिताः, वयम्,
यत् , राज्यसुखलोभेन, हन्तुम्, स्वजनम्, उद्यताः ll४५ll


अहो हे पद आश्चर्यवाचक आहे व बत हे पद खेदवाचक आहे. धर्म-अधर्म, पापपुण्य, कर्तव्य-अकर्तव्य याला जाणणारे आम्ही पाप करण्याचा निश्चय करतोय ही खेदाची गोष्ट आहे व आश्चर्याचीही. ती बरोबर नाही.
आपल्या सद्विचारांचा, माहितीचा आदर केल्यानेच मनुष्य, शास्त्र, गुरुजन यांची आज्ञा पाळू शकतो. याचा अनादर केल्यास, आम्हांस अनर्थपरंपरेपासून कोण रोखेल?

येथे अर्जुनाची दृष्टी युद्धा कडे आहे. या युद्धाला दोषी समजून तो दूर जाऊ इच्छितो. परंतु खरा दोष कोणता याकडे त्याचे लक्षच नाही. युद्धात कौटुंबिक मोह, स्वार्थभाव, कामना हे दोष आहेत पण त्याचे लक्ष याकडे नाही जे वास्तविक कोणत्याही विचारशील, धर्मात्मा, शूरवीर क्षत्रियासाठी योग्य नाही.


यदि मामप्रतीकारमशस्त्रं शस्त्रपाणयःl
धार्तराष्ट्राः रणे हन्युःस्तन्मे क्षेमतरं भवेत् ll४६ll

यदि, माम्, अप्रतीकारम्, अशस्त्रम्, शस्त्रपाणयः,
धार्तराष्ट्राः, रणे, हन्युः, तत्, मे, क्षेमतरम्, भवेत् ll४६ll

जर मी युद्धा पासून निवृत्त झालो तर दुर्योधनही निवृत्त होईल. आम्ही लढलोच नाही तर युद्ध का होईल? पण समजा त्यांना आमचा काटाच काढायचा असेल तर ते आम्हांला ठार मारतील व ते आम्हांस कल्याणकारी असेल. कारण मी जे युद्ध करुन गुरुजनां ठार करण्याचा निश्चय केला होता त्या पापातूंन मुक्त होईन. माझे प्रायश्चित्त होईल. मी शुद्ध होईन व माझ्या कुलाचाही नाश होणार नाही.
अर्जुनाने शोकाविष्ट होऊन २८ श्लोका पासून बोलण्यांस प्रारंभ केला तेंव्हा ते शोकविव्हळ नव्हते. जितके ते आता आहेत. तो युद्धा पासून दूर जात आहे, धनुष्यबाणाचाही त्याग करत आहे व खाली बसत आहे. भगवंत अर्जुन बोलत असतांना मधे काहीच बोलले नाहीत कारण अर्जुनाच्या अंतःकरणात कोणताही शोक राहिला नाही तरच भगवंताच्या बोलण्याचा परिणाम होईल. त्याचा वेग उतरल्यावरच आपण बोलावे.
विधिलिखितास थांबवणे मनुष्याच्या हातातील गोष्ट नाही. परंतु आपल्या कर्तव्याचे पालन करुन मनुष्य आपला उद्धार करु शकतो व कर्तव्यच्युत होऊन आपले पतन करु शकतो. भगवंतानी अर्जुनाला कर्तव्याचे ज्ञान करवून मनुष्यमात्राला उपदेश केला आहे की त्यांने शास्त्राज्ञे नुसार आपल्या कर्तव्याचे पालन करण्यात तत्पर असावे त्यापासून कधीही पाठ फिरवू नये.

आपण *Surekha's Geetashree* या नावाचे YouTube channel सुरू केले आहे.पहिल्या अध्यायाचे काही श्लोक यावर upload केले आहेत. तरी सर्वांनी *Surekha's Geetashree* या channel ला *Like* करा, *Subscribe* करा व नविन श्लोक अपलोड केल्याचे notification येण्यासाठी *Bell icon* दाबा.

खालील लिंकवर दाबून channel ला subscribe करा.



Channel Subscription विनामूल्य आहे.


संजय उवाच
एवमुक्त्वार्जुनः संख्ये रथोपस्थ उपाविशत् l
विसृज्य सशरं चापं शोकसंविग्नमानसः ll४७ll

एवम्, उक्त्वा, अर्जुनः, संख्ये, रथोपस्थे, उपाविशत्,
विसृज्य, सशरम्, चापम्, शोकसंविग्नमानसः ll४७ll

युद्ध करणे हे संपूर्ण अर्थांचे मूळ कारण आहे, युद्ध करण्याने कुटुंबियांचा नाश होईल व परलोकात नरकाची प्राप्ती होईल असे म्हणून शिकावे. व्याकुळ झालेल्या अर्जुनाने युद्ध न करण्याचा पक्का निर्णय केला. ज्या रणभूमीवर हातात धनुष्य घेऊन उत्साहाने आला होता त्याच रणभूमीवर आपल्या हातातील गाण्डीव खाली ठेवले आणि स्वतः ज्या सैन्याला पाहण्यासाठी रथात उभा होता तेथेच शोकविव्हळ स्थितीत बसला.

ॐ तत्सदिती श्रीमद्भगवदगीतासूपनिषत्सु ब्रम्हविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णर्जुनसंवादेऽर्जुनविषादयोगो नाम प्रथमोऽध्यायः ll१ll
प्रत्येक अध्यायाच्या शेवटी महर्षी वेदव्यांसानी ही उपरोक्त पुष्पलता लिहिली ज्यातून श्रीमद्भगवदगीतेचे विशेष महात्म्य आणि प्रभाव प्रगट होतो.
ॐ तत् सत्----ही तिन्ही परमात्म्याची पवित्र नांवे आहेत. ही सर्व जीवांचे कल्याण करणारी नांवे आहेत. यांचा उच्चार केल्याने मनुष्य परमात्मा सम्मुख होतो आणि शास्त्र विहित कर्तव्य कर्माचे वैगुण्य नाहीसे होते. गीतेचा अध्यायाचा पाठ म्हणत असता काही उणिवा राहील्या असतील तर त्यांच परिमार्जन होते. म्हणून"ॐतत्सत्"
श्रीमत्---सर्व शोभा संपन्न आहेत आणि ज्यांच्या ठिकाणी ऐश्वर्य, धर्म, यश, श्री, ज्ञान व वैराग्य आहे त्या भगवंताच्या मुखातून प्रगट झालेली. श्रीमत् भगवत्गीता---भगवंतानी मस्तीत येऊन गायली म्हणून गीता.
उपनिषद्---सर्व उपनिषदांचे सार.
ब्रम्हविद्या---वर्ण, आश्रम, संप्रदाय ह्यांचा आग्रह न ठेवता पाराणिमात्रांचे कल्याण करणारी सर्व श्रेष्ठ विद्या.
योगशास्त्रे----कर्मयोग, ज्ञानयोग, भक्तियोग, ध्यानात साधनांची माहिती ज्याद्वारे साधकाला परमात्म्याशी नित्य संबंध यावा.
श्रीकृष्णार्जुनसंवाद---हा साक्षात पुरुषोत्तम भगवान् श्रीकृष्ण आणि भक्त अर्जुन यांचा संवाद. अर्जुनाने निःसंकोचभावाने प्रश्न विचारले आहेत आणि भगवंतानी उभारलेले त्याची उत्तरे दिली आहेत. यात उभयतांचे भाव आहेत म्हणून.
या पहिल्या अध्यायात अर्जुनाच्या विषादाचे वर्णन आहे. हा विषाद सुद्धा भगवंत अथवा सत्संग झाल्यास संसारा विषयीवैराग्य निर्माण करून कल्याणकारी करणारा होतो. प्रत्येक अध्यायाच्या शेवटी पुष्पिका देण्याचे तात्पर्य हे "जर साधक एका अध्यायाचा ही योग्य रितीने पठणपाठण विचार करेल तर एकाच अध्यायाचे त्याचे कल्याण होईल.

संदर्भ : श्रीमद्भगवद्गीता साधक - संजीवनी मराठी टीका - स्वामी रामसुखदास (गीता प्रेस गोरखपुर)

Disclaimer: The views expressed are my personal opinions and the blog is for generic information purpose only. Readers are advised to verify the  facts.All content provided in the blog is for informative purpose only. The owner of this blog makes no representations as to the accuracy or completeness of any information on this blog or bound by following any link on this blog. The owner will not be liable for any errors or omissions in the information nor for the availability of the information. The owner will not be liable for any losses, injuries or damages from display or use of this information. These terms and conditions of use are subject to change at any time and without notice.

No comments:

Post a Comment